HW News Marathi
देश / विदेश

तिथे दिल्लीत ठाकरे-मोदी भेट झाली, आणि इथे देसाईंनी स्वबळाची घोषणा केली

औरंगाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दरम्यान, काही वेळ उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात व्यक्तिगत भेटही झाल्याचं समजत आहे. दरम्यान, दिल्लीत तिथे ठाकरे-मोदी भेट असताना इथे शिवसेनेत मात्र निवडणुकांबाबत वेगळीच भूमिका घेतली आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शिवसेनेच्या ३६ व्या वर्धापनदिनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. राज्यात महाविकासआघाडीचं तीन पक्षांचे सरकार असतांना त्यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

विशेष म्हणजे दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आधी राज्यातील विविध विषयांवर चर्चा आणि त्यानंतर अर्धा तास वैयक्कित भेट. या भेटीनंतर राजकीय वर्तृळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असतांनाच संध्याकाळी शिवसैनिकांच्या व्हर्च्युल मेळाव्यात देसाई यांनी शिवसैनिकांना भगवाच फडकवायचा, असे आदेश दिले. ठाकरे-मोदी भेटीच्या काही तासांतच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाविकास आघाडीतील कुरबुरी, राजकीय वातावरण आणि त्यात ठाकरे-मोदी या दोन नेत्यांमध्ये झालेली वैयक्तिक चर्चा त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे. मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या औरंगाबादमधील शिवसेना शाखेला ८ जून रोजी ३६ वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी व्हर्च्यूल पद्धतीने मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच खरतंर संवाद साधणार होते, पण दिल्ली दौऱ्यांमुळे ही जबाबदारी देसाईंवर आली.

मराठवाड्यात शिवसेनेने काय केले हे सांगत असतांनाच राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कशी विकासकामे होत आहेत, जनतेचा त्यांच्यावर कसा विश्वास आहे, हे देसाई यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे सहा व विधान परिषदेत एक असे सात आमदार निवडून आले. याचा दाखला देतांनाच यापुढील महापालिका, जिल्हा परिषदा व सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचे आवाहन देसाई यांनी या मेळाव्यात केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UNSCमध्ये रशियाविरोधात ‘व्हिटो पॉवर’चा वापर, जाणून घ्या…नेमके काय आहे

Aprna

सबरीमाला मंदिर निकाला संदर्भात आझाद मैदानात आंदोलन

News Desk

#Amritsar : रावणाची भूमिका साकारणाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू

Gauri Tilekar