HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण आणि कोरोनावर सरकारनं अधिवेशन बोलवावं, चंद्रकांत पाटलांची मागणी

मुंबई | सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर आज (५ मे) सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक निकाल दिला आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारला हा मोठा धक्का सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर भाजपकडून सरकारला घेरण्याचाप्रयत्न सुरु झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारने कोरोना आणि मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो. मराठा आरक्षणाचं काय करावं यासाठी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण आजचा निकाल म्हणजे राज्य सरकारच अपयश आहे”, अशी टीका चंद्रकांत पाटील केली आहे.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस, सरकारचा निष्काळजीपणा नसल्यानं हा निकाल लागला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. कोर्टाचा निकाल आला आहे त्याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं, ठाकरे सरकारनं याला सामोरं जावं, असं आव्हानही प्रविण दरेकर यांनी सरकारला दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंडित बिरजू महाराज निधन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली

News Desk

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

News Desk

भारताला आणखी एक सुवर्ण पदक!

News Desk