HW News Marathi
महाराष्ट्र

परिवहन विभागासाठी लगेच पैस दिले मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही? माजी उर्ज्यामंत्र्याचा सवाल

नागपूर | वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एका मिनिटात एक हजार कोटी रुपये दिले जातात. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही?; असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे.

सरकारने १०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिलं. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचं नाव खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारमध्ये वाद आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.वीजबिल माफीसाठी ५००० कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही.

अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवालच त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यभरातून वीजेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. तर, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढीव वीज बिलाच्या समस्येवर तोडगा काढून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिंपाईच्या वतीने जातीवाद्याच्या विरोधात प्रांत कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा

swarit

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावाला देणार भेट….!

News Desk

‘शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’, सेना भवनासमोरील राड्यावरुन शेलारांचा घणाघात

News Desk