HW News Marathi
महाराष्ट्र

बिहारमध्ये निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर… संजय राऊत यांचा टोला

मुंबई | बिहारमध्ये विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. पण जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. एएनआयशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीवरुन प्रश्न उपस्थित करत कोरोना बिहारमध्ये संपला का ? अशी विचारणा केली आहे. ‘बिहार निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे.

“विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. पण बिहारमध्ये करोना संपलाय का हेदेखील पाहिलं पाहिजे. जर कोरोना संपला नसेल तर तुम्ही निवडणूक कशी घेणार आहात, प्रचारसभा कशा होणार?. मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाहीयेत. बिहार एक मोठं राज्य आहे. देशाच्या राजकारणात बिहारचं महत्व आहे. त्यामुळे तिथे निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे ? काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून संकटाला सामोरे जावू! – किशोरी पेडणेकर

Aprna

केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – महेश तपासे 

News Desk

‘शिवाजीचे उदात्तीकरण’ पुस्तकावर भाजपच्या मागणीनंतर बंदी येणार ?

swarit