HW News Marathi
महाराष्ट्र

वीज बिल माफीसाठी उर्जामंत्र्यांना उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची साथ नाही, माजी उर्जामंत्र्यांचा आरोप

चंद्रपूर | राज्यातील लोकांना वीज बिल माफ करणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली. राज्यातील ३ पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बील माफी अडली, असा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. राज्य सरकारनं ऊर्जा खात्याला ७ ते ८ हजार कोटी रुपये अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सरासरी वीज बिलात दुरुस्ती आणि १२०० युनिटपर्यंत वीज बिलमाफीचा शब्द सरकार फिरवत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडमध्ये वीज पडून शेतकरी जखमी, एक म्हैस व गायीचे वासरु ठार

News Desk

“कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका..” – चित्रा वाघ  

News Desk

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राम शिंदेंनी घेतली उदयनराजेंची भेट

News Desk