HW News Marathi
महाराष्ट्र

“तुमचा भुजबळ करु म्हणणाऱ्यांना सांगायचं की…” छगन भुजबळांचा इशारा

मुंबई | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे भेट घेतली. त्यावेळी दोघांतर्फे भुजबळांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

तुरुंगात रहायला कुणाला आवडेल?

मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. तुमचा भुजबळ करु असे म्हणणाऱ्यांना त्यांनी यावेळी इशारा दिला आहे. “तुरुंगात रहायला कुणाला आवडेल? दोन ते तीन वेळा प्रकृती अतिशय बिघडली होती. आता दुखःचा पाढा वाचण्यासाठी वेळ नाही. आता पुढे जायचे आहे. तुमचा भुजबळ करु असे म्हणणाऱ्यांना सांगायचं की त्यांचं सुद्धा भुजबळांसारखंच होईल. मला सुद्धा न्यायदेवतेने न्याय दिला आणि सोडलं. तसं त्यांना सुद्धा त्रास होणार पण ते सुद्धा मुक्त होणार,” असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.

सरकार सुद्धा मदत करु शकलं असतं

सरकार आणि गृहखात्याने तुम्हाला मदत केली असा आरोप केला जात आहे पत्रकारांनी विचारले असता भुजबळांनी त्यावर भाष्य केलं. “सरकार सुद्धा मदत करु शकलं असतं तर आता सुद्धा अनेक मंत्र्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे तेव्हा तिकडे का नाही मदत करु शकत. त्यांना बोलायला मोकळीक आहे आणि मला त्यावर काही भाष्य करायचं नाही,” असे भुजबळांनी म्हटले आहे.

साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये

छगन भुजबळ यांनी यावेळी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला मंत्रीमंडळाने ठरवले होते की हे बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असे सांगितले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये ८०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागलं,” असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.

“आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळ्यात यावं यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं आहे. ईडीची कारवाई ही महाराष्ट्र सदन प्रकरणातून पैसे मिळाले यातून ही केस बांधली गेली आहे. अतिशय विनम्रपणे संयम करुन आम्ही या यशाचा स्विकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही. कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं. साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये, ये तो आपकी जनता की दुआयें है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,” असे म्हणत भुजबळांनी सर्वाचे आशिर्वाद सोबत असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्र सरकार कर्तव्यात चुकल्यानेच OBCआरक्षण रद्द झालं”

News Desk

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

गणेशोत्सवाला जाताना चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम, जाणून घ्या कोणते?

News Desk