HW News Marathi
महाराष्ट्र

सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरक्षणासंदर्भात एकदिलाने काम करावे – छत्रपती संभाजीराजे

मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर काल (२७ जुलै) व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. ३ सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारने ५ न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली. तसेच, व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणे मांडण्यास अडचणी येत असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नोकर भरती करु नये, असे सांगण्यात आले. दरम्यान, याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय काल देण्यात आला. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नसल्याचे म्हटले आहे. तसेच, याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावे, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावं. सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही.

मराठा समाजाने प्रचंड त्यागातून आत्तापर्यंत चा पल्ला गाठला आहे. याबाबत केंद्र शासनाने सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाची सुनावणी ही व्हिडीओ काँफेरेनसिंग द्वारे घेऊ नये आणि हा मुद्दा 5 न्यायाधीशांच्या संवैधानिक पिठाकडे पाठवावा अशी समाजाची आणि माझी सुद्धा सुरुवाती पासून मागणी आहे. त्याकरिता न्यायालय २५ ऑगस्टला सुनावणी घेणार आहे. त्यावेळी शासनाने जोरदार मोर्चे बांधणी करणे आवश्यक आहे. पुढील सुनावणी वेळी समाजाची बाजू भक्कम पणे मांडली जाईल असा विश्वास व्यक्त करतो, असे त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे.

https://www.facebook.com/136216326536595/posts/1628126697345543/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री यांची नियुक्ती

Aprna

तुकाराम मुंढे यांची कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिली पोस्ट

News Desk

मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळांचा राज्य सरकारला सवाल

News Desk