HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असणार मराठी

नवी मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. गोगोईनंतर सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस ए बोबडे) यांची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत.

शरद अरविंद बोबडे हे मुळेचे नागपूरचे आहेत तर त्यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूरमध्ये झाला. बोबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे १९७८ मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. मार्च २००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ही बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, बोबडे यांनी मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे कुलपती म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त होतील. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून ५२३ दिवसांचा दीर्घकाळ असणार आहेत. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे ४६ सरन्यायाधीशांपैकी फक्त १६ जणांना ५०० दिवसांचा कार्यकाळ मिळाला आहे, आता त्यात न्यायमूर्ती बोबडे यांची नाव सामील होणार आहे. यापूर्वी सरन्यायाधीश कापडिया १२ मे २०१० ते २८ सप्टेंबर १२ यांना ८७० दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली?

News Desk

…तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो – प्रकाश आंबेडकर

News Desk

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दिलासा नाहीच!

News Desk