HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण !

मुंबई | “मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण”, असे सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शिवसेनेच्या ५३ वा वर्धापनदिनाच्या कार्यक्रम शीव येथील षण्मुखानंद सभागृहात म्हणाले आहेत. विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी राज्यात वाघ आणि सिंहाचेच राज्य येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दोन्ही पक्षात काही काळ तणाव होता, मात्र, मतभेद दूर करून जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला त्यांचा मोठा भाऊ असल्याचे म्हटले आहे. “हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही. तसेच विकासाचे काही निर्णय घेतले आहे ते योग्यवेळी जाहीर करू “, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्धापन दिनाला उपस्थित आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा यावेळी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वर्धापन दिनाच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मानले आभार
  • पक्षाच्या वर्धापनदिनाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला बोलावण्याची ही ऐतिहासीक घटना आहे.
  • आमची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे आदेश द्यावे लागले नाही, त्यांनी स्वंयस्फूर्तीने काम केले
  • विकासाचे काही निर्णय घेतले आहे, ते योग्यवेळी जाहीर करू मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
  • शिवसेनाप्रमुखांचे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे.
  • मुख्यमंत्री कोण ही चर्चा प्रसारमाध्यमांना करू द्या, आपण विकासासाठी काम करू
  • आगामी काळात राज्यात दुष्काळ येणार नाही, यासाठी काम करायचे आहे.
  • देशात ताजमहाल उभा राहत असताना जाणता राजा सामान्यांचे अश्रू पूसत होता, ती प्रेरणा आमच्यासमोर आहे
  • ‘मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण
  • आपली प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे.
  • जनता आगामी विधानसभा निवडणुकीत युतीला मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास केला व्यक्त
  • शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचे ध्येय आहे.
  • आम्ही निवडणुकांसाठी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.
  • शिवसेना पक्ष वाढला पाहिजे, शिवसेना मोठी झाली पाहिजे अशा दिल्या शुभेच्छा
  • राष्ट्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे करायला हवे, त्यासाठी आपण काम करत आहोत.
  • आमचे हिंदुत्व संकुचित नाही, आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे, प्रत्येक जातीचे, भाषेचे याला बंधन नाही
  • शिवसेनेच्या कार्यक्रमात आल्यावर घरी आल्यासारखे वाटते, आपण भगव्या ध्वजासाठी लढणारे आपण आहोत
  • विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी राज्यात वाघ आण सिंहाचेच राज्य येणार आहे
  • वाघ आणि सिंह एकत्र असल्यावर राज्य कोण करणार असा प्रश्नच उपस्थित होत नाही
  • काही काळ तणाव होता, मात्र, मतभेद दूर करून जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
  • सर्वात जास्त काळ एकत्र असलेली युती आहे.
  • शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचे प्रेम मिळवण्यासाठी आणि शिवसैनिकांची उर्जा मिळवण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत
  • उद्धव ठाकरेंनी मला बोलावताना आणि मला आमंत्रण स्वीकारताना प्रश्न पडले नाही, मात्र, इतरांना ते पडतात
  • आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत चर्चा होती
  • मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचा माठे भाऊ असा केला उल्लेख
  • छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केले नमन
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही, बावनकुळेंचा गौप्यस्फोट!

News Desk

शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद! – UNचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

Aprna

पंकजा मुंडेंच्या टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

News Desk