HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस सर्वात बालीश: शरद पवार

मुंबई: शेतकरी कर्जमाफी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टिकास्र सोडले. फडणवीस यांच्यासारखा बालीश मुख्यमंत्री मी पाहिला नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. या आधी झालेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील सहकारी बँकांना अधिक प्रमाणावर झाल्याचा आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे.

फर्स्टपोस्ट या इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी शेतकºयाच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. ते म्हणाले,‘‘मुख्यमंत्र्यांना वाटते शेतकºयांना कर्जमाफी दिल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील बँका आणि सहकारी बँकांना फायदा होणार आहे. पण हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. आता मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप केला आहे. मग आता राष्ट्रीयीकृत बँकाही काँग्रेस-राष्ट्रवादीवाले चालवतात का? कर्जमाफी संदर्भात शेतकºयांची आश्वासनपूर्ती करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत.’

येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत शेतकºयाच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्याच शेतकºयाची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल

Gauri Tilekar

पेगॅसस प्रकरणात केंद्राची लपवाछपवी, मायबाप सरकार खरं बोला, पेगॅसस वापरले की नाही?

News Desk

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna