HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?

बार्शी | “मुख्यमंत्री सांगतात, गृहमंत्री सांगतात, इथे कायही निवडणूकच नाही. देशाचा गृहमंत्री २० सभा घेत महाराष्ट्रच्या कानकोपऱ्ऱ्या घेऊन कशा फिरतात.” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री म्हणतात “इथे सक्षम विरोधक नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही.” असे म्हणत पवारांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले. पवारांनी आज (१२ ऑक्टोबर)  बार्शीतील राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, ” काही लोक म्हणातात, मुख्यमंत्री सांगतात, गृहमंत्री सांगतात, इथे कायही निवडणूकच नाही. देशाचा गृहमंत्री २० सभा घेत महाराष्ट्रच्या कानकोपऱ्ऱ्या घेऊन कशा फिरतात. देशाच्या पंतप्रधान आदेश जाहीर झाला ९ सभा घेत महाराष्ट्रात येणार आहेत.  मुख्यमंत्री तर ५-५० सभा घेत फिरत आहेत. आता इथे लढाई नाही निवडणूक नाही मग सगळे जण येथे येतात कशाला ?  काय  प्रदर्शनासाठी येतात की, महाराष्ट्र बघायला येतात, असाल उलट सवाल पवारांनी मुख्यमंत्री आणि शहांना केला.

बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण जागादाखविणार !

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन बाधले. “बार्शीकर अशा पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविता, हा हा मला ५० वर्षाचा अनुभव आहे.” सोपल यांचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. पवार पुढे म्हणाले की, “अनेक वेळा मी तुमच्या पुढे आलो,  महाराष्ट्रच्या विधासभेच्या कामासाठी आलो, अदी प्रमाताईपासून त्यांच्याबरोबर आम्ही काम केले आले. बार्शीचे वैशिट्यचे बार्शीकर शब्दाला पक्का होता. आज ज्या बार्शीकरांनी मोठे केले त्यांनी शक्ती दिली. त्यांच्या शब्दात न जाण्याची भूमिका घेणार कोणी असे तर त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.” 

काही लोक म्हणतात, हे आले ते गेले,  गेल्याची कशाला चर्चा करायची फार तर तुकवटा चारव कारायचा, उगीच गेलेल्याची जास्त चर्चा नको,  मी फक्त समजून घेण्याचा प्रयत्न केला ते का? गेले. मला कोणी तरी सांगितले की, मला बार्शीचा विकास कारायचा, चांगली गोष्टी आहे. इतकी वर्षे आम्ही तुम्हाला निवडून दिली. तिकीटे दिली, मंत्री पदे दिली. तेव्हा तुम्ही केले काय केले विकास केला आहा. आणि आज आम्हाला सांगाताय मला विकास कारायचा आहे. आज महाराष्ट्र विधीमंडळमध्ये आणि राज्यामध्ये अनेकांना शक्ती देऊ मोठे करण्याचा प्रयत्न केला. तो विचार पूर्व केला त्या भागातील प्रश्न सूटावे म्हणून दिली समर्थपणे त्या भागाचे प्रतिनिधत्व करावे म्हणून केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

News Desk

भाजपातर्फे राज्यभरात घंटानाद, शंखनाद आंदोलन!

News Desk

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

News Desk