HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

मुंबई | ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरु झाली आहे. ठाकरे सरकारने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची आज (२४ फेब्रुवारी) शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून हे सर्व शेतकरी ६८ गावातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहेत. तसेच एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर केल्यानंतर परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना राबवितांना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत, अशी भावना ठेवू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देूऊ नका बळीराजाला दुखवु नका,” अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.

पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांसाठी मनसेचा उद्या ठाण्यात मोर्चा

News Desk

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

News Desk

पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही ‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? रोहित पवारांचा भाजपला सवाल 

News Desk