HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफी, दहा रुपयांत थाळी, ठाकरे सरकारच्या १० मोठ्या घोषणा

नागपूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय, दहा रुपयात शिवभोजन यासह दहा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी काल (२१ डिसेंबर) नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा सभागृहात केली. या घोषणेव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी १० महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या १० घोषणा

१) महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.

२) गोरगरीबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन योजना सुरू करणार. ही योजना प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरू होणार आहे.

३) पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

४) समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार आहे. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रुपये वाचणार.

५) समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार आहे.

६) यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार आहे

७) कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करू

८) सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही

९) आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद

१०) मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोलीत भूसुरुंगाच्या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती

News Desk

“हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…”आनंद महिंद्रांचा आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!

News Desk

लॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk