HW News Marathi
महाराष्ट्र

कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, कर्मचाऱ्यांच्या पगाराची दोन टप्प्यात विभागणी होणार !

मुंबई | “राज्यातील सराकरी कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, कर्मचाऱ्यांच्या पगाराची दोन टप्प्यात विभागणी केली जाणार आहे,” असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज (३१ मार्च) राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हीद्वारे संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकाड ३०२ वर गेला आहे.

“कामगार आणि मंजुरांनी स्थलांतर करू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. “करोनाशी लढ्याचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा जवळ आला आहे,” असे ते म्हणाले. या करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण जिंकणारच असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माध्यमामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात येण्याच्या बातमी आज प्रसारित होत. यानंतर मला फोन आले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरत देत म्हणाले की, ” सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यातील सराकरी कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, कर्मचाऱ्यांच्या पगाराची दोन टप्प्यात विभागणी केली जाणार आहे,” असा विश्नास मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिली.

दरम्यान, परदेशातून आलेल्याची माहिती लपवून नका, सर्दी, खोकला लक्षणे आढळल्यास खाबरू नका. सध्याचा काळा हा सर्दी-खोकल्याचा आहे, तशी लक्षणे आढळल्यास तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात जा, असे सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने एकच मंत्र लक्षात ठेवा. कुठेही गर्दी करु नका. आपण या युद्धात जिंकणार म्हणजे जिंकणारच, असे विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 

  • राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०२ वर
  • कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, कर्मचाऱ्यांच्या पगाराची दोन टप्प्यात विभागणी
  • गरमी वाढली म्हणून एस नको, थंड पेय टाळा,
  • शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनात कपात करणार नाही
  • कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्याचे आहे, राज्याची आर्थिक घडी मोडू नये यासाठी प्रयत्न
  • खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेव नये
  • परदेशातून परतल्याची माहिती लपवू नका
  • सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळल्यास घाबरून जाऊ नका, तुमच्या जवळील सराकरी रुग्णलयात जा
  • आपल्या संयमाचे कौतुक कराल तेवढे कमीत आहे
  • मजुरांनी स्थलांतर करु नका, त्यांच्या जेवणाची सोय सरकार करेल.
  • शिवभोजन थाळ्यांची संख्या २५ हजार करण्यात आली आहे, गरज पडल्यास १ लाखापर्यंत करु.
  • जीवनावश्यक, अत्यावश्यक सोयींचा मुबलक पुरवठा आहे.
  • विनाकारण गर्दी करुन शिस्त मोडू नका.
  • रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, काळजी करु नका.
  • हे युद्ध आपणंच जिंकणार, आत्मविश्वास कायम ठेवा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचा बायोपीक प्रदर्शित होणे आणि विवेक ओबेरॉयच्या घरी रेड पडणे हा नियतीचा खेळः सचिन सावंत

News Desk

मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग

News Desk

पिंपरी-चिंचवडचा रिकव्हरी रेट जास्त ही समाधानकारक बाब – देवेंद्र फडणवीस

News Desk