HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनानंतर आता औरंगाबादमध्ये सारी आजाराचा शिरकाव

औरंगाबाद | कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण देश कसे बाहेर पडता येईल याचा मार्ग शोधत असताना आता सारी या आजाराने चिंतेत भर पाडली आहे. आज (११एप्रिल) दिवसभारात औरंगाबादमध्ये सारीचे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क होतीच पण आता सारीमूळे आणखी दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे.

आज सारीचे जे रुग्ण दाखल झाले त्यापैकी १५ रुग्णांना खासगी रुग्णालयात, ६ जणांना घाटी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ३ जणांचा आज मृत्यू झाला असल्याची माहिती औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. दरम्यान, आज औरंगाबादमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने लोकांमध्ये आणि आरोग्य विभात एक आशेचा किरण आला आहे. तसेच, २१ अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यानेही औरंगाबादकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ११ कोटी ८ लाख रुपये निधी वितरित !

swarit

राज्यातील मासेमारी यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा; डिझेल परताव्याचे ११ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता

Aprna

मोठी बातमी ! नष्ट केलेला डीव्हीआर, सीपीयू एनआयएला सापडला, तपासावेळी सचिन वाझेही उपस्थित

News Desk