HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या योजनेतून फक्त तांदूळ, तर केशरी कार्डधारकांना वगळले !

मुंबई | “केंद्र सरकारच्या योजनेत फक्त तांदूळ आहेत. तेही केवळ लाभार्थ्यांसाठी आहे. मात्र केंद्राच्या योजनेचा लाभ केशरी कार्डधारकांना नाही.” त्याचे राज्य सरकार वितरण सुरू झाले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मात्र, “केशरी शिधापत्रिका धारक मध्यमवर्गीय आहे. त्यांच्यासाठी ३ किलो गहू ८ रुपये किलो दराने व २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. मी पंतप्रधानांना यासंदर्भात किमान आधारभूत किंमतीत धान्य यासाठी मिळावे अशी विनंतीही केली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, “जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिव भोजनाची सोय केली आहे. सोय केली आहे. निवारा केंद्रात ६ लाख लोकांना दिवसांतून दोन वेळेस जेवण, नाश्ता देत आहोत. माणुसकी हाच एक धर्म आहे जो आम्ही पळत आहोत,” असेही त्यांनी यावेळीसांगितले.

लॉकडाऊनमुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत, असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच लॉकडाऊन काळात टीव्ही वाहिन्यांवर कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी टीव्ही वाहिन्यांना केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांचा ‘हा’विश्वासू नेता लवकरचं शिवसेनेत..

Gauri Tilekar

प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा बजावला समन्स

News Desk

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

News Desk