HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड : लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांकडून सूचना

मुंबई | हिंगणघाट जळीत कांड प्रकरणात लवकरात लवकर आरोप पत्र दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविभागास दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज (५ फेब्रुवारी) बोलविण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीत महिलांवरील अत्याचारच्या प्रकरणावर चर्चा करताना दिल्या आहेत. महिलांवरील अत्याचार सहन करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत म्हणाले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्भया फंडाबाबत माहिती मागवली आहे. राज्यातील दामिनी पथकाला अधिक ताकदवान करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची माहिती पोलीस ठाण्यात येऊन नोंदवता यावी. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणी सुरु करता येतील का ? यासंबंधीची गृहविभागाने चाचपणी करावी असेही आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महिला अत्याचारांच्या घटनेत न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास खूप विलंब लागतो. यात न्यायासाठी झगडणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो, असे होऊन नये. गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावा. यासाठी महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागतील यादृष्टीने राज्य शासन फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना यासारख्या गोष्टीं प्राधान्याने हाती घेणार आहे. राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण हा ही त्यातील एक महत्वाचा विषय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर !

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर राणा दांपत्याविरोधात निवडणूक लढवतो!- अब्दुल सत्तार

Aprna