HW News Marathi
Covid-19

केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत !

मुंबई | नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावे, हे गडकरींनी आवाहन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (२६ एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हणाले.

राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या केल्या आहेत. १ लाख १ हजार १६२ जणांचे नमुने निगेटिव्ह आलेत. जवळपास ७ हजार ६२८ नमुने पॉझिटिव्ह आले आणि ३२३ रुग्णांचा मृत्यू झालाय. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

  • काळजी घेतली तर कोरोना बरा होईल
  • फळ वाहतूक आणि कापूस खरेदी सुरू आहे
  • फळ घरपोच पोहचवण्याचा विचार सुरू आहे.
  • लॉकडाऊनमूळे कोरोनाचा गुणाकार हा कमी झाला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत उद्या व्हिडिओ कोन्फरेंस होणार असल्याची माहिती दिली
  • १ लाख ७२ हजार कोरोना चाचण्या केल्या आहेत
  • रतन टाटा, मुकेश आंबानी आणि बिर्ला यांनी मदत केली आहे.
  • २० टक्के लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, व्याधी असलेल्यांनी जास्त खबरदारी घ्यावी
  • ३ मेनंतर काही मुभा द्यांची आहे, यांचा विचार सुरू आहे.
  • ३ मेला लॉकडाऊन उठणार आहे. याचा अर्थ गाफील राहू नका, गर्दी करू नाक
  • मुंबईत काही ठिकाणी मुभा दिल्यानंतर गर्दी झाली होती.
  • देशातील ८० टक्के लोकांना कोरोनाचे लक्षणे नाहीत
  • कोरोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल
  • केंद्राकडून गहू आणि गाळींची गरज आहे
  • केंद्रच्या पथकाने त्रयस्थपणे निरीक्षण करावे
  • लॉकडाऊन संपेपर्यंत ट्रेन सुरू होणार नाही
  • गर्दी करू नका, ट्रेन सुरू होणार नाही, सरकारच्या सुचनेचे पालन करा
  • परप्रांतींना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी प्रत्यन केले सुरू आहेत.
  • नितीन गडकरींनी राजकारण बाजुला ठेवून सहकार्य केले, संकटाच्या काळात काही जण राजकारण करत आहे. राजकारण करणाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आणि नितीन गडकरींनी मनापासून आभार मानले आहे.
  • निवडणूका येतील जातील. सत्ता येते जाते, जीव गेला तर परत येणार नाही
  • लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग संथ होण्यात यशस्वी होत आहे
  • पोलीस आयुष्य बाजुल ठेवून काम करत आहे
  • कोरोनाच्या संकटात मदत करणारे देवा आहेत
  • कोरोनाच्या युद्धात लढताना दोन जवान शहीद झाले आहे, मोठ्या तणावाखाली जवान काम करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
  • आरोग्य दूत आणि सफाई कामगार हेच देव आहेत.
  • लोकांनी जो संयम पाळाला तोच देव आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगरपालिकेकडून ‘फेसमास्क’ न वापरणा-यांकडून एका दिवसात ३२ लाखांची दंड वसुली रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखाना इत्यादींमध्येही धडक कारवाई

News Desk

वरळी कोळीवाडा कंटेनमेंट झोनमुक्त होणार

News Desk

कोरोनाच्या काळात राजकरण नको!

News Desk