HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार वनगा यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई | पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी वनगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते. विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वनगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारकडून कांद्याला प्रति क्विंटलमागे २०० रुपये अनुदान जाहीर

News Desk

आजपासून विधिमंडळाचे २ दिवसीय पावसाळी अधिवेशन होणार सुरू

News Desk

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

Manasi Devkar
महाराष्ट्र

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

swarit

पालघर | भाजपाचे खासदार चिंतामण वनगा (६७) यांचे दिल्लीत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालायात त्यांना दाखल करण्यात आले होते, असून उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. हे कळताच संपूर्ण पालघर परिसरात शोककळा पसरली आहे.

१९९० ते १९९६ या काळात भाजपाचे ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष होते. पहिल्यांदा १९९६मध्ये खासदार झाले असून १९९९मध्ये दुसऱ्यांदा खासदार झाले होते. तसेच २०१४मध्ये निवडणुकीत आमदार असतातनाच पुन्हा एकदा खासदार म्हणून त्यांची निवडण्यात आली.

चिंतामणी या टोपण नावाने लोक ओळखले जात होते. दिल्लीहून बुधवारी ३१ जानेवारी रोजी वगना यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आण्यात येणार असून पालघर येथील तलासरी येथे वनगा यांच्या पार्थिववर दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

Related posts

“सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान”, नाना पटोलेंची सडकून टीका!

News Desk

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा! – उद्धव ठाकरे

Aprna

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

News Desk