HW News Marathi
महाराष्ट्र

‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच आहे’, चित्रा वाघांचा राठोडांवर निशाणा

मुंबई | शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे. पूजा चव्हाण हिचं कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागलं असून हे संभाषण संजय राठोडांसोबत होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यावर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया ट्विट केली आहे. या प्रकरणामुळे संजय राठोडांच्या अडचणीत भर पडली आहे.

‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच’

चित्रा वाघ यांनी ट्विट करत थेट संजय राठोडांवर आरोप केला आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली मात्र असं असताना चित्रा वाघ यांनी असं म्हटलं आहे. ‘पुण्यातील तरुणीने आत्महत्येपूर्वी संजय राठोडशी फोनवरुन संभाषण केल्याचा पोलिसांना संशय… ‘त्या’ तरु/णीचं फोन संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळतीये..’मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच… सत्य परेशान हो सकता है पराजित नही…जय हो…’अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

संजय राठोड पुन्हा मंत्रिपदावर?

संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले, असं दैनिक महाराष्ट्र टाइम्सने आपल्या वृत्तात दिलं होत.

काय आहे प्रकरण?

संबंधित तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधीच्या सरकारने बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत !

News Desk

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna

जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला आमचा पाठींबा – अजित पवार

News Desk