HW News Marathi
महाराष्ट्र

“दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपली नाही, दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”

अमरावती | हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा रेटून धरला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले.

यावरुन भआजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत ही लढाई अजूनही संपली नसल्याचे म्हटले आहे. दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपलेली नाही.रेड्डीचं निलंबन झालयं पण दिपालीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यास शिवकुमार एकटाचं नाही तर रेड्डी ही तितकाचं जबाबदार त्यामुळे रेड्डीला सहआरोपी करत त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आज ही कायम आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वरिष्ठांकडून विशेष महिला पोलीस अधिकारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे रविवारी तपास सोपविल्यानंतर आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय वर्षा खरसान, पीएस आय सुयोग महापुरे, पोलीस कर्मचारी अनिल झारेकर, अरविंद सरोदे यांनी कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा सोमवारी दुपारी दीड वाजता न्यायालय धारणी येथे हजर केले असता, प्रथम न्यायाधीश एम.एस. गाडे यांनी त्याला एक दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावल्याने आरोपी विनोद शिवकुमार बाला हा ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला | भिडे गुरुजींचा आरोप

News Desk

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्ज आज होणार सुनावणी

Aprna

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांवर, कोरोना रुग्णसंख्या वाढतीच!

News Desk