HW News Marathi
महाराष्ट्र

“रश्मीताई, राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या तुम्ही कधी आवळणार?”, भाजपचा शिवसेनेला सवाल

मुंबई | भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ या नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसत असतात. मुंबईमध्ये साकीनाका परिसरात जी घटना घडली त्याने सगळेच हादरून गेले आहेत. चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेच्या सामना अग्रलेखावर प्रश्न उठवला आहे. अग्रलेखावरुन भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर आणि विशेषत: संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.

काय आहे ट्विट?

“संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील महिलांबाबतची असणाऱ्या तालीबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत….एका महिलेवर अमानवीय अत्याचार झालेला आहे त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही,” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच “अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर ताई, घाबरू नका, चिंता करू नका, हल्लेखोरांना शिक्षा होईल असं म्हणत फक्त भावनिक भुरळ घालायची,” अशा शब्दांमध्ये वाघ यांनी राऊतांवर टीका केलीय.

इतकचं नाही तर वाघ यांनी, “संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केंव्हापासून झालात?,” असा प्रश्नही उपस्थित केलाय. “तपास पुर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रेलखातून अत्याचार करणारा ‘एकच’ नराधम होता असे घोषीत करताय. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी आहे की ही विकृती आहे?”, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

“मला ‘सामना’च्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचे कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करताहेत. तर तुम्ही अशा तालीबानी प्रवृत्तीच्या मुसक्या कधी आवळणार आहात?,” असा प्रश्न रश्मी ठाकरेंना विचारला आहे.

“मुंबईतील साकीनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार झाला. एका नराधमाने त्या महिलेवर निर्घृण हल्ला करून तिला ठार केले. या घटनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. त्या अभागी महिलेस वाचविण्यासाठी पोलिसांनी व डॉक्टरांनी शर्थ केली, पण पीडितेचा मृत्यू झाला. बलात्कार करणारा नराधम कोणी मोहन चौहान हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या व त्याच्यावरील खटला ‘फास्ट ट्रक’ कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याला फासावर लटकवले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य असून असे निर्घृण कृत्य करणारे नराधम कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नाहीत. तरीही या सर्व प्रकरणावर राज्यातील विरोधी पक्षाने गदारोळ माजवला आहे. राज्यात कायद्याचे राज्य नाही, कायद्याचा धाक नाही, अशी भाषा विरोधकांनी वापरली आहे,” असं त्या म्हणाल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC च्या कामाचे ‘कॅग’कडून ऑडिट; ‘पारदर्शकतेचा आभाव’, फडणवीसांचा आरोप

Aprna

ठाकरे सरकार मधील आणखीन काही नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!

News Desk

‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं दिसत आहे’, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला  

News Desk