HW News Marathi
महाराष्ट्र

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”, मनसुख हिरेनच्या मृत्यूवरुन चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल  

मुंबई | पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि ठाकरे सरकारला वेठीस धरले होते. आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकं ठेवून गाडी घराबाहेर कुणी उभी केली, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणालाच नाट्यमय वळण मिळाले असून, चित्रा वाघ यांनी मागील घटनांचा संदर्भ देत सरकारला ठाकरे सवाल केला आहे.

मनसुख हिरेन यांचा मुंब्रातील रेतीबंदर परिसरात मृतदेह आढळून आला. ठाण्यात राहणाऱ्या हिरेन यांची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्यानं आता शंका विरोधकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. याच प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत सरकारकडे निष्पक्ष चौकशीची आशा व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलिब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल’’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

News Desk

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण, संपूर्ण परिसर सील

swarit

अन्यथा मरेपर्यंत उपोषणाची परवानगी देण्याची आरोपीची न्यायालयाकडे मागणी

News Desk