HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजपसोबत ३० वर्ष होतो तेव्हा काही झालं नाही मग आता काय होणार…?”, उध्दव ठाकरेंचं मोदी भेटीवर उत्तर!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (६ जुलै) राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल झालेल्या गोंधळावर भाष्य केले. भास्कर जाधव यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी, आमदारांनी केलेल्या चुकीच्या वर्तनावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी काल जे घडलं ते अतिशय लाजीरवाणं होतं, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. ही आपली संस्कती नाही. ही आपली परंपरा नाही, असे ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या भेटीवर प्रश्न विचारला आणि भविष्यात भाजपसोबत जाण्याचा विचार आहे का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ३० वर्ष भाजप सोबत होतो तेव्हा काही झालं नाही मग आता काय होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या हजरजबाबी उत्तरावर एकच हशा पिकला होता.

जनतेला समाधान मिळेल असं अधिवेशनात काम केलं : उद्धव ठाकरे

दोन दिसांच्या अधिवेशनाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तुम्ही ऐकला. या दोन दिवसांमध्ये आम्ही जनतेला आनंदी तसेच समाधान देऊ असं काम केलं आहे. यावेळी सर्व विधानसभेत, विधानपरिषदेत जे सदस्य उपस्थित होते त्यांना धन्यवाद देतो. तसेच ज्या व्यक्तींकडून जे घडू नये ते घडले ते सुधारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.

काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल झालेल्या गोंधळावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी काल जे घडलं ते अतिशय लाजीरवाणं होतं, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. ही आपली संस्कती नाही. ही आपली परंपरा नाही, असे ठाकरे म्हणाले.

विधिमंडाळातील कामकाजाचा दर्जा खालावण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न आहे हे पाहले पाहिजे. लोकप्रतिनिधींकडे जनतेची अपेक्षा असते. माझ्या आयुष्यात काही बदल घडला पाहिजे असे जनतेला वाटते. तसेच हा बदल जिथे घडतो त्या ठिकाणी लोकप्रनिधींना जनता पाठवते. मात्र, काल जे काही दृश्य पाहायला मिळालं ते शरमेने मान खाली जावी असं कृत्य होतं. हे एका जबाबदार पक्षाने केलं.

वेडवाकडं वागायचं, आरडाओरडा करायचा. हे करायचे असेल तर रस्त्यावर करु शकता. मात्र, सभागृहामध्ये माईक असतात. माईक ओढायचे हे काही आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षणं नाहीयेत. भास्करराव यांच्या दालनात जे काही घडलं त्यातील बरचसं वर्तन त्यांनी केलं. ते ऐकल्यानंतर सिसारी यावं असं हे वर्तन आहे. हा देशात तसेच राज्यात पायंडा पाडयाला नकोय. त्यासाठी प्रत्येकाना आपली मर्यादा काय आहे, हे समजून घ्यायला हवे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk

आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा! – सुभाष देसाई

Aprna

“महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा प्रयत्न,” राऊतांचा आरोप

Aprna