HW News Marathi
महाराष्ट्र

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

मुंबई। शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महाभारताचा उल्लेख करून भाजपला कौरवाची उपमा दिली होती. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली आहे. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रांगणात माध्यमांशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. पांडवांनी कौरवांना केवळ सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो, दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दुशासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असं फडणवीस म्हणाले.

१२ आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी सांगितल आहे.

यावेळी त्यांनी कृषी कायद्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने तीन कायदे सभागृहात मांडले. त्यांनी कृषी कायदे फेटाळले नाहीत हे चांगलं झालं. कृषी कायद्यात त्यांनी काही सूचना सूचवल्या आहेत. हे अपेक्षितच होते. त्यातील दोन कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजून घ्यायचो. आता कोणीही चर्चा करण्यासाठी आलं नाही. कारण डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक अधिक काळ टिकत नाही, अशी टीका विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या-

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. हिंमत असेल तर गुप्त मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, असं आव्हानच त्यांनी दिलं. अजित पवार यांनी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदाचं लॉलीपॉप दिल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार आम्हाला प्रतिविधानसभा भरू देत नव्हते, असंही ते म्हणाले. या सरकारने २३ हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजीनामा सत्र अद्यापही सुरूच’, ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन मस्के मुंबईकडे रवाना!

News Desk

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk

OBC Reservation | राज्य सरकारच आता गोळा करणार इम्पिरिकल डाटा

News Desk