HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज (३१ जुलै) नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक उड्डाणपुलाचं भूमीपूजन पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समारंभाला व्हिडीओ लिंकद्वारे हजेरी लावली होती. कडबी चौक ते गोळीबार चौक 4.82 किमीचा नवीन उड्डाणपूल असून, यासाठी 146 कोटी रुपये खर्च आला.

या उद्घाटन समारंभावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलताना सुरुवातीलाच नितिनजी तुमचं वर्णन काय करु आणि कसं करु. कारण दिवसागणिक तुमचं कर्तृ्तव हे वाढतचं चाललं आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. त्यांच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, आज मला युतीच्या सरकारमध्ये झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची आठवण येते.

नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीत हा हायवे उभारण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की, मुंबई – पुण्याला जाणारा सरळ रस्ता हवा. आता तर तुम्ही हे अंतर आणखीनच कमी केलं आहे. नितीन गडकरींच्या कामाचा अभिमान वाटतो. आता आपण समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकर सुरु करतोय.

गडकरीसाहेब आपली मदत लागणार

नितिन गडकरीसाहेब राज्याला आपली मदत लागणार आहे. रस्ते खचतायत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गडकरींकडच्या तंत्रज्ञानाची राज्याला गरज आहे. भविष्यात पर्यावरणाचं हित सांभाळात काम करायचं आहे. कितीही पाऊस पडला तरीही बाधा येणार नाही, असं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. राज्यातील रस्ते खचले आहेत. ते वर्षानुवर्षे कसे टिकतील या करता आपली गरज लागणार आहे. आपत्ती निवारताना आता मोठा खर्च येतोय, त्यामुळे आता जे काही करायचे ते मजबूत करायचं आहे. सहकार्याचा रस्ता नॅरोगेज न राहता ब्रॅाडगेज असावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार..”

नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभावाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. “नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं. तुम्ही ही शहरं जोडली. आता तर अंतर कमी करून तुम्ही ती अजून जवळ आणत आहात”, असं ते म्हणाले.

“स्वप्न पाहायलाही धाडस लागतं”

“स्वप्न पाहायलाही धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता, तर म्हटला असता बघतो मी जरा, कसं शक्य आहे, काय होऊ शकतं, कसं होईल. पण तुम्ही तात्काळ सांगितलं मी करतो आणि करून दाखवलंत. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. तुमची पुढची वाटचाल आत्ता तुम्ही ज्या गतीने करता आहात, त्याच गतीने व्हावी, अशा मी शुभेच्छा देतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी दिल्लीबाबत काय म्हणाले होते?

नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी २९ जुलैला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यातील नव्या केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी गडकरींनी अनेक किस्से सांगितले होते. त्यावेळी आपण दिल्लीच्या राजकारणात कसे आलो हेही गडकरींनी सांगितलं. गडकरी म्हणाले होते की, “मी दिल्लीत अपघाताने आलो. मी दिल्लीत येण्यासाठी तयार नव्हतो. पण जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी साहित्य, मराठी इतिहास हा एकदमच वेगळा आहे. महाराष्ट्र देशातच आहे. मराठी सारस्वताचा, महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र सगळ्या बाबतीत पुढे आहे. महाराष्ट्र अजून समृद्ध, शक्तीशाली व्हावा, असं आपल्या सर्वांचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्याला भारत सरकारमध्ये काम करत असताना मिळते. त्या संधीचा उपयोग करावी”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार कसून तयारी

News Desk

शरद पवार, गौतम अदानी बारामतीत ‘या’ उद्घाटन सोहळ्यासाठी हजर

News Desk

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ! पडळकरांची मागणी

News Desk