HW News Marathi
Covid-19

विदेशातील महाराष्ट्रीयन नागरिकांना देशात आणण्यासाठी ठाकरे सरकारने उचलली पावले

मुंबई | जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. अनेक श्रमिक, लोकं वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. या सर्व मजुरांना आपापल्या गावी परत जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मात्र, अजूनही देशाबाहेर अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. त्यासोबत एक मेसेजही देण्यात आला आहे. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, पण सध्या विदेशात अडकले आहात. तर, खाली देण्यात आलेला फॉर्म भरावा, अशी माझी आपणास विनंती आहे. राज्य सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयास याबाबतची माहिती देण्यात येईल. तसेच आपल्याला लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १७ कोटींची मद्यविक्री, उत्पादन शुल्क आयुक्‍तांचा अंदाज

News Desk

‘कोविड योद्धा’ निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख नागरिकांकडून ‘आरोग्यसेतू’ॲप डाऊनलोड

News Desk