HW News Marathi
महाराष्ट्र

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत निवासस्थान असलेले राजगृह महाराष्ट्रातील जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे.

आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निलेश राणेंनी कंगणा रणावतला झापलं !

News Desk

संजय राऊत यांनी कुटुंबाची माफी मागितली नाही तर… भाजप आमदाराचा इशारा

News Desk

भीम आर्मीची उद्या अमरावतीमध्ये सभा

News Desk