HW News Marathi
महाराष्ट्र

नारळ पाण्यातून आई – वडीलांना मुलाने पाजले विष

लातूर | पोटच्या मुलाने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष घातल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे. या प्रकरणात ६५ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आई वडिलांना विष देणा-या व्यक्तीचे लग्न होऊन केवळ एक महिन्याचा अवधी झाला आहे. सुन लेकाचा सुखी संसार पहाण्यासाठी औरंगाबादहून लातूरला हे आई वडील आले होते अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा ज्ञानदीपला अटक केली आहे. पोलिसांचा सुनेवरही संशय आहे. लातूर शहरातील घर नावावर करुन देत नसल्यामुळे ज्ञानदीपने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मृत्यू झालेले ज्ञानदीपचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य होते. घरगुती कारणांवर ज्ञानदीपने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या सुट्टीत वाढ, १४ दिवस असणार सुट्टी – वर्षा गायकवाड

News Desk

HW Exclusive : अमोल कोल्हेंनी लॉकडाऊनमध्ये नैराश्य आलेल्यांचे असे वाढवले मनोधैर्य

News Desk

अंघोळीची गोळी संस्थेला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

News Desk