HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात थंडीचा जोर वाढला, मुंबईत १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मुंबई। मुंबईसह महाराष्ट्रातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने राज्यातल्या जनतेला चांगलीच हुडहुडी भरली आहे. मुंबईत आज (१७ जानेवारी)सकाळी १२.३अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकच्या निफाडमध्ये या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचे तापमान २.४अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. निफाडमधील कुंडेवाडीच्या हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे.

यंदाच्या मोसमातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. काल (१६ जानेवारी) निफाडमध्ये तापमान ९.४अंश सेल्सिअस इतके होते. राज्यातील किमान वा कमाल तापमानात कालपासून घसरण सुरू झाली असून, आता रात्रीच नव्हे, तर दिवसाही गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक प्रभाव आहे. गोवा व कोकणच्या तापमानातही घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ९.८ होते, तर मुंबईत १५.४ अंश तापमानाची नोंद झाली.

येत्या २४ तासांतही पुणे, मुंबईसह उत्तर महाराष्ट्र व अनेक ठिकाणी पारा खाली उतरेल. मुंबईमध्ये कमाल तापमान २६ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पुण्यात तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली उतरण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानवाढीची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. राज्यात २० जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या २६ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करणार

Aprna

गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही, महेश टिळेकरांची टीका

News Desk

जलसा, प्रतिक्षा, रामायण हे फिल्मसिटीचं वैभव, हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? राऊतांचा योगींना सवाल 

News Desk