HW News Marathi
महाराष्ट्र

२० जानेवारीपर्यंत ५० % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार – उदय सामंत 

मुंबई | कोरोनाच्य पार्श्वभूमीवर शाळा कॉलेज अनेक महिने बंद होते. हळूहळू शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले. आता येत्या २० जानेवारीपर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (९ जानेवारी) जाहीर केले आहे. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.

५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामंत यांनी सांगितलं की, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमांना १५ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी प्रवेशांना ही सोमवार, मंगळवार या दिवशी आणखी २ दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू आहेत. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk

धनगर समाजाला आरक्षण द्यावस वाटलं नाही का?, सदाभाऊ खोतांचा राज्यसरकारला संतप्त सवाल!

News Desk

सचिन वाझे यांचा तपास आमच्याकडे द्या, ATS ची मागणी!

News Desk