HW News Marathi
महाराष्ट्र

चैत्यभूमीवर प्रवेश नाकारल्यामुळे अनुयायांमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात

मुंबई | महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने देशभरातील अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. यावेळी चैत्यभूमीवर ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. परंतु चैत्यभूमीवर पोलिसांनी काही अनुयायांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी गोंधळ घातला होता. यामुळे चैत्यभूमीवर काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले

कोरोना नियमाच्या अंतर्गत चैत्यभूमीच्या परिसरात बॅरिकेड लावण्यात आले होते. काही अनुयायांनी बॅरिकेड ओलांडून चैत्यभूमीवर शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. या अनुयायांनी पोलिसांसोबत झटापट झाल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दादरमध्ये अनेक अनुयायी दाखल झाले होते. मात्र, यावेळ सरकारकडून त्यांच्यासाठी कोणत्याही सोयीसुविधांची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वानखेडे विरोधात घोषणाबाजी

महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जावून अभिवादन केले. वानखेडेंनी अभिवादन करून जाताना भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात घोषणाबाजी केली. “आज जो लढा सुरू आहे. त्यासाठी मला इथे प्रोत्साहन मिळते,” असे वानखेडेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. “वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही,” भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचं निर्मला सीतारमण यांना पत्र, पूरग्रस्तांसाठी केली ‘ही’ मागणी!

News Desk

गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आता ऑनलाइन घेता येणार

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

News Desk