HW News Marathi
महाराष्ट्र

किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप, मंजुरीसाठी दिल्लीला पाठवणार

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांनी किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप दिले असून वरिष्ठांच्या मंजुरीसाठी दिल्लीला पाठविणार असल्याची माहिती माध्यमांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच लवकरात लवकर सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असून राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे.

महाराष्ट्रातील विविध प्रश्न, शहर विकास, पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर ध्येय आणि धोरणे आखण्यासंबंधी विचार विनिमय झाला. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील चर्चांचा तपशील हायकमांड पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यातील बदल आणि दुरुस्त्या त्यांनी सुचविल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिवसेनेचे गटनेता एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादीतचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता माणिकराव ठाकरे, काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेते समन्वय बैठकीत उपस्थित होते.

शरद पवार-सोनिया गांधींची भेट

तसेच येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटणार आहे. येत्या १७ नोव्हेंबरला राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार ?

News Desk

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला

News Desk

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवारांची नियुक्ती

swarit