HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणूनच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला !

धुळे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं या संविधानाचे रक्षण करण्याचं काम काँग्रेसनं केलं म्हणूनच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असं भाष्य नाना पटोले यांनी शिरपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही कारण त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी सर्व व्यवस्था मोडीत काढली आहे. देशाचे पंतप्रधान हे पद सर्वोच्च आणि सन्मानाचे पद आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे.

मोदी सरकारने कोरोनाच्या परीस्थितीत देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. लोकांचा जीव जात असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.दरम्यान, लसीकरण मोहिम फसली आहे मात्र प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स आणि होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढलं आहे. लोकशाहीमध्ये फर्मान कसं काय काढलं जाऊ शकतं?, अस सवालही नाना पटोलेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज इस्रो करणार दोन ब्रिटिश उपग्रहांचे प्रक्षेपण

Gauri Tilekar

मोठी बातमी! शरद पवार घेणार अमित शहांची भेट!

News Desk

राफेलविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळल्या

News Desk