HW News Marathi
महाराष्ट्र

देशातील जनता-विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सोनियांची भाजपवर टीका

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात संपूर्ण देश पेटून उटला आहे. या कायद्याविरोधातील आंदोलनाला उत्तर प्रदेशमध्ये हिंसळ वळण आले असून यात आज (२० डिसेंबर) ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या कायद्याविरोधात देशातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाजप सरकारवर टीका केली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आवाज उटविणे हा लोकशाहीने जनतेला दिलेला अधिकार आहे. सरकारने देशातील जनतेचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, भाजप सरकार हे देशातील जनता आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून यासाठी सरकार बळाचा वापर करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, “भाजप सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन रोखण्यासाठी भाजप सरकार बळाचा वापर करत आहे. भाजपच्या विभाजनकारी धोरणाविरोधात देशभरातील विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम आणि इतर नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जोरदार आंदोलन प्रदर्शन करत आहेत. चुकीचे निर्णय आणि धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा लोकशाहीत जनतेला अधिकार आहे. लोकांचे म्हणणे ऐकणे हे सरकारचे काम आहे. त्यांनी लोकांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला!

News Desk

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठीची परवानगी शासनाने प्रलंबित ठेवल्याने पडळकरांची टीका

News Desk

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे” फडणवीसांची खोचक टीका

News Desk