HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…! यशोमती ठाकूर यांचा शरद पवारांना इशारा

मुंबई । राज्यात एकीकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांमध्ये आपली एकजूट दाखवत महाविकास आघाडीने भाजपला दणका दिला आहे. तर दुसरीकडे अजूनही महाविकासआघाडीत अंतर्गत धुसफूस मात्र कायम असल्याचेच चित्र आहे. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधत इशारा दिला आहे. “सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

यशोमती ठाकूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” पुढे यशोमती ठाकूर असेही म्हणाल्या कि, “काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.”

दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखती शरद पवार यांना राहुल गांधींच्या नेतृत्व गुणांवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी, “राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव आहे” असे मत पवारांनी नोंदवले होते. त्यावरून आता राज्यातील काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या भाषणाचा विपर्यास झाला! प्रसाद लाड यांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

News Desk

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

News Desk