HW News Marathi
देश / विदेश

राजीव सातव यांचं जाणं म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळाचा दिवस!, काँग्रेस नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे | खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली असून, राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे अशा शब्दांत नेतेमंडळींनी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. कमी वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली. उच्चशिक्षित, साधं राहणीमान आणि अभासृ वृत्ती अशी राजीव सातव यांची ओळख. त्यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुल गांधी

“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

नाना पटोले

निशब्द.. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त !

अशोक चव्हाण

खा. राजीव सातव यांचे निधन काँग्रेससाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र व मराठवाड्याचे मोठे नुकसान आहे. मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते अभिमान होते. आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे.

सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

‘राजीववर ईश्वर प्रसन्न आहे, जे मागितले त्याला ईश्वर तथास्तु म्हणतो अशी नेहमी आमच्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा असायची. पण ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला. हॉस्पिटलमधून मला माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्या हेलावलेल्या हृदयात कोरलेल्या राहतील.’ असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

 

सत्यजित तांबे

राजीवभाऊ, आपण कायम संघर्ष करुन विजय मिळवला, ह्या आजाराच्या संकटावरही आपण मात करुन शेवटच्या क्षणी तरी बाहेर याल हीच माझ्यासह अनेकांची अपेक्षा होती. दुर्देवाने आम्ही सगळेच हारलो. हजारो युवकांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक हरपला.

नियती क्रुर आहे. नियतीच्या ह्या चुकीसाठी कधीच माफी नाही.

23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (16 मे) सकाळी 5 वाजता कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा राम रहिमच्या ‘त्या’ इशाऱ्यामुळेच हरियाणात हिंसाचार

News Desk

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

News Desk

पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये इंधन दरवाढीचा उडाला भडका

News Desk