HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता कॉंग्रेसची आज होणार बैठक

मुंबई | राज्यातील कोरोना संकट वाढत असताना सर्व राजकीय कार्यक्रम रद्द, राजकीय पक्षाच्या बैठकी रद्द केल्या असल्या तरी काँग्रेस पक्षाने नियोजित बैठक रद्द न करता याचे आयोजन आज (२३ फेब्रुवारी) मुंबईत केले आहे. त्यामुळे सरकारमधील मित्र पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत हे उघड होत आहे.काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची टोलेजंग बैठक मुंबईत आयोजन आज केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता महिला विकास महामंडळ सभागृह, नरिमन पाईंट येथे होणार आहे.

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले होते. ‘सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सामाजिक, राजकीय, धार्मिकसह सर्व कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते.

विशेष म्हणजे, विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष यांनी देखील त्यांच्या राजकीय बैठका आणि आंदोलन रद्द केले. मात्र, शिवसेनेचा महाविकास आघाडीत मात्र मित्रपक्ष काँग्रेसच्या पक्षाने पार्लमेंटरी बोर्डची बैठकीचे आयोजन केले आहे.काँग्रेसचे देशातील आणि राज्यातील सर्वव प्रमुख नेते या बैठकीला उपस्थितीत राहणार आहे. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारच्या वतीने लोकांना कमी गर्दी करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच मित्र पक्ष मधील नेते मुख्यमंत्री यांचा ऐकत नाही, अशीच सद्यस्थिती दिसून येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संत तुकोबांच्या पालखीचे दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान

News Desk

ती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, पडळकरांचा घणाघात

News Desk

वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी, संभाजीराजेंची मागणी

News Desk