HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या बंगल्यासमोर सकाळपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागते !

मुंबई | राज्यातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एक विधान केले आहे. “माझ्या मुंबईतील बंगल्यासमोर सकाळपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागते. शेवटी मला हात जोडून सांगावे लागते कि ‘नंतर पाहू’, अशी परिस्थिती आहे. आता नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्यास तयार नाहीत”, असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन हे जळगाव येथे पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

“आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राहण्यास कोणताही नेता तयार नाही. भाजपमध्ये येण्यासाठी माझ्या मुंबईच्या बंगल्यावर सकाळपासून रांग लागलेली असते. शेवटी मला हात जोडून असे सांगावे लागते कि ‘नंतर पाहू’, अशी परिस्थिती आहे”, असे गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षांतराचे प्रमाण मोठे होते. लोकसभेदरम्यान अनेक नेत्यांनी अन्य पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता भाजपचा ऐतिहासिक विजय आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव या पार्श्वभूमीवर तसेच काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूक लक्षात घेता अद्याप हे सत्र सुरूच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वेतन पडताळणी पथक १८ ते २१ जुलै दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर 

News Desk

सारथी’ बंद होणार नाही, स्वायत्तता कायम राहणार

News Desk

विरोधी पक्षातील आमदारांचा आज भाजप प्रवेश

News Desk