HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्र्वादीकडून मनधरणीचा प्रयत्न, हर्षवर्धन पाटील मात्र ‘नॉट रिचेबल’

मुंबई | इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत मोठा वाद सुरु आहे. दोन्ही पक्ष इंदापूरच्या जागेवर आपला हक्क सांगत आहेत. म्हणूनच, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याप्रमाणे, ४ सप्टेंबर रोजी त्यांनी कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करत अन्याय भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस, राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होत असून हर्षवर्धन पाटील मात्र त्यास सकारात्मक प्रतिक्रिया देत नसल्याची माहिती समोर येत आहे.

“हर्षवर्धन पाटील यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ असल्याने माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. आता काय करायचे हे हर्षवर्धन पाटील यांनीच ठरवायचे आहे”, असे काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी खरंतर आपल्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. “लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही”, असे स्पष्ट विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. मात्र, दुसरीकडे इंदापूरच्या जागेबाबत हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आज सकारात्मक चर्चा झाल्याचे देखील म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना ब्रीच कँडीमधून डिस्चार्ज, तब्येत उत्तम 

News Desk

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यासाठी एसटी महामंडळ काढणार २००० कोटींचं कर्ज

News Desk