HW News Marathi
महाराष्ट्र

…अमिताभ बच्चन व अक्षय कुमारचे पिक्चर महाराष्ट्रात बंद पाडू – नाना पटोले

भंडारा | काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले आज(१८ फेब्रुवारी) अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचं अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्च सह पदयात्रा याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात अमिताभ बच्चन व अक्षय कुमारचे पिक्चर चालणार नाही व शूटिंग व देखील बंद पाडू असा इशारा दिला आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ, गॅसची दरवाढ यामुळे सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं ज्यावेळी मनमोहन सिंह यांचं सरकार होतं. त्यावेळेस अभिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल हे टिवटिव करायचे. ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. आज ते गप्प का आहेत? महाराष्ट्रामध्ये अभिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा पिक्चर आणि शुटींग महाराष्ट्रात चालू देणार नाही. असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही टीका केली. यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते. त्यावेळी 70 रुपये लिटर पेट्रोल झाले तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.

आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचाराविरोधात आता सेलिब्रिटी बोलत नाहीत म्हणूनच काँग्रेसने या भाजपाच्या पोपटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रिटींनी पाठिंबा देताच या सेलिब्रिटींना ट्विट करून मोदी सरकारची तळी उचलण्याचे काम केले. ८५ दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करत आहे. भारतीय जनता पार्टी, भाजपाचा आयटी सेल यांनी या आंदोलनाला खलिस्तानी, नक्षलवादी, दहशतवादी म्हणून बदनाम केले त्यावेळीही या सेलिब्रिटींनी मौन पाळले. परंतु भाजपाच्या आयटी सेलच्या सांगण्यावरून त्यांनी शेतकरीविरोधी ट्विट केले. हे सेलिब्रिटी भाजपाच्या आयटी सेलचे पोपट आहेत का? असा सवालही पटोले यांनी विचारला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मला ही विधान परिषदेची ब्यादच नको, राजू शेट्टींची खदखद 

News Desk

बारश्याच्या कार्यक्रमात अल्पवयीन मुलाचा बळी

News Desk

Pune Wall Collapse : सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख, तर जखमींना २५ हजार

News Desk