HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? अजित पवारांनी दिली माहिती

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून तिथे लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

“आपल्याकडून डॉक्टर साळुंखे यांना आम्ही आढावा घेण्यासाठी पाठवलं होतं. त्यांनी सकाळीच मला सांगितलं, आपण येथील चौकात असून कोणीही मास्क वापरत नाही. संख्या झपाट्याने वाढत असताना कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याची चर्चा झाल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोललो. बैठक होणार असून शहरापुरता लॉकडाउन ठेवायचा की संपूर्ण जिल्ह्याला लागू करायचा याबद्दल अंतिम निर्णय होईल,” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाचा कहर ! आज तब्बल ४० हजारांहून अधिक नवे रुग्ण

News Desk

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

News Desk

राज्यात लॉकडाऊन काळात आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल

News Desk