HW News Marathi
Covid-19

जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे !

मुंबई | “राहुल गांधींचे वक्तव्य दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी लाचार झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय घेण्याचाच अधिकार नसेल तर मग जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेतून पडा”, अशी घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे राजकीय वातावरण पेटलेले असताना आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या टीकेनंतर महाविकासाआघाडी विशेषतः काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल म्हणजेच मंगळवारी (२६मे) त्यांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेसबद्दल केलेल्या मोठ्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निशाणा साधला आहे.

“राज्याला सद्यस्थितीला शिवसेना, राष्ट्रवादी इतकाच काँग्रेस पक्षही जबाबदार आहे. राहुल गांधींनी हे वक्तव्य करून अत्यंत दुटप्पी भूमिका घेली आहे. काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे. सत्तेत राहून फायदा तेवढा कमवण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. कोरोनामुळे लोकं संकटात असताना राज्यातले मंत्री मात्र गायब आहेत. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्ये जर काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर मग जनाची नाही, पण मनाची असेल तरीही त्यांनी सत्तेतून पडावे”, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना “हे सरकार फक्त फेसबुकवरच चालणार का ?”असा बोचरा सवालही विखे-पाटलांनी उपस्थित केला होता.

राहुल गांधींचे ‘ते’ नेमके वक्तव्य काय ?

“महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही”, असे राहुल गांधी म्हणाले. “महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. काय सांगाल ?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राहुल गांधींनी हे उत्तर दिले. “दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाही. एखादे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे ह्यात मोठा फरक आहे. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कहर ! राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांची नोंद ५० हजारांच्या जवळपास

News Desk

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण

Aprna