HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा, दिग्विजय सिंहांच्या भावाची मागणी

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला कात्रीत धरलं आहे. अशात आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीदेखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर १०० कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत. असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं.

अनिल देशमुखांवर सर्वच स्तरांमधून टीका होत असतानाच त्यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख बदलले जाणार नाहीत. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नतच उपस्थित होत नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्डाची सक्ती नाही

News Desk

गॅसदरवाढीवरून राज्यसभेत गदारोळ

News Desk

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ वर ! देशात सर्वाधिक कोरोनारूग्ण महाराष्ट्रात

Arati More