HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरमध्ये भाजपने घोडेबाजार करत विजय मिळवला; पटोलेंचा भाजपवर आरोप

मुंबई | भाजपने नागपूरमध्ये घोडेबाजार करून विजय मिळाविल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था आज (१४ डिसेंबर) निकाल लागला आहे. यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा ३६२ मतांनी विजयी झाला आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना नाना पटोलेंनी भाजपवर आरोप केला आहे.

पटोले म्हणाले, “काँग्रेसच्या मतांमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब असून ते सायकलवरून फिरणारा होता. परंतु भाजपाच उमदेवारा हा आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असून या आर्थिक बलाढ्य उमेदवाराची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. भाजपच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगर पालिकेमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी जे भाजपकडे जास्त होते. म्हणजे भाजपकडे ९० पेक्षा जास्त मते असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या उमेदवार घेऊन पळावे लागले. आणि भाजपने त्यांच्या लोकप्रतिनिधींना देश पर्यटन करण्याची व्यवस्था करावी लागली. भाजपने घोडेबाजार करावा लागला. खऱ्या अर्थाने तर हा भाजपचा नैतिक पराभव आहे.”

दरम्यान, आज जो निकाल आलेला आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण भाजपने घोडेबादार करण्याचे जे कृत्य केले आहे. हाच भाजपचा नैतिक पराभव असून लोकांमधून निवडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्यांच्यात भाजपचा जनतेने सफाया केला. पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा मोठा पराभव झाला. देशाला स्वातंत्र मिळाल्यापासूनचा मतदारसंघ हा भाजपकडे होता. तेथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्राचे बलाढ्य मंत्री हे सर्वे असताना सुद्धा त्यांचा पराभव होतो.

भाजपला आत्मचिंतनाची गरज

या निवडणुकीत कोणाला आत्मचिंत करण्याची गरज आहे यावर पटोले म्हणाले, “ज्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींना घेऊन देशपर्यटन करावे लागेल. त्यांचा घोडेबाजार करावा लागला असेल. त्यांच खऱ्या अर्थाने आत्मचिंतनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या टीकेला आम्ही नंतर उत्तर देऊ, नागपूरमध्ये भाजपने घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. स्वत:चे मतदार

नागपूर महानगरपालिका भ्रष्टाचारान बरबटलेली

विधान परिषदेच्या निकालावर काँग्रेसचे कुठे चुकले असा प्रश्न विचारल्यावर पटोले म्हणाले, “आमचे कुठेही नुकसान झाले नाही. भाजपचा एक माणूस आमच्याकडे आला. आमचा पक्ष पुन्हा मजबूत झाला. उलट भाजपचा पराभव झाला. आमचे गणित कुठेच चुकले नाही. आमचे +च आहे.” “नागपूर महानगर पालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. गेल्या अनेक वर्षे भाजपची सत्ता आहे. भाजपने नागपूर शरहाचा सत्यानास केला आहे. जेसे नागपूर ग्रामीणने भाजपला त्यांची जागा दाखविली आहे. तसेच नागपूर शहराच्या नगर पालिकेत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास दाखविला आहे, असे म्हणत पटोलेंनी आगामी निवडणुकीबाबत प्रश्नाला उत्तर दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk

मोदी हे आधुनिक भारताचे लोहपुरुष | उदयनराजे भोसले

News Desk