HW News Marathi
Covid-19

शेतकरीविरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही !

कोल्हापूर | “केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन सुरुच असून आज कोल्हापुरात भव्य ट्रॅक्टर रॅली काढून विरोध आणखी तीव्र करण्यात आला. शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त करणारे हे अन्यायी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी यावेळी बोलताना दिला तर शेतकऱ्यांच्या या संघर्षाची मशाल पेटवली आहे. या पेटलेल्या वणव्यात केंद्र सरकार नेस्तनाबूत होईल, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्यचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून कोल्हापुरात आज (५ नोव्हेंबर) ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, केंद्रातील सरकारने घाईघाईने हे कायदे मंजूर केले. विरोध करणाऱ्या खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. हे कायदे शेतकऱ्यांच्याच विरोधातील नाही तर तुमच्याही विरोधातील आहेत. मुठभर व्यापारी, साठेबाज, नफेखोर, भांडवलदार यांच्या हितासाठी हे कायदे बनवले आहेत. या कायद्याने शेतकऱ्यांचा माल स्वस्तात खरेदी करुन व्यापारी साठेबाजी करणार आणि महागात लोकांना विकणार. या कायद्यात आधारभूत किंमतीची व्यवस्थाच ठेवलेली नाही. काँग्रेसच्या सरकारने आणलेले शेतकरी, कामगारांच्या हिताचे कायदे भाजप सरकारने संपुष्टात आणले आहेत. फक्त व्यापारी, भाडंवलदार, लोकांच्या हिताचे विचार करणारे हे सरकार आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी २ कोटी सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे यात एकट्या महाराष्ट्रातून ५० लाख शेतकऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, जातीयवादी, धर्मांध शक्तींना सत्तेपासून दूर ठेवत राज्यात तीन पक्षाने एकत्र येऊन माणूस हा केंद्र मानून सरकार स्थापन केले आहे. एक वर्षाच्या काळातच महाविकास आघाडी सरकारने चक्रीवादळ, कोरोना, विदर्भातील पूर आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या संकटाचा सामना केला परंतु शेतकरी व जनतेला मदतीचा हात देण्यात कधीच मागपुढे पाहिले नाही. सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. विदर्भातील महापुरात मदत केली आता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. परंतु, आधीच्या फडणवीस सरकारने कोल्हापुरला मागच्या वर्षी पूर आला त्याचे पैसे कधी दिले असा सवालही त्यांनी विचारला. उद्या (६ नोव्हेंबर)सांगली येथे भव्य टॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोरोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते! शिवसेना आमदाराची जीभ घसरली

News Desk

देशांतर्गत विमानप्रवासासाठी ‘या’ आवश्यक अटी व शर्थी

News Desk

…तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक, पालकमंत्र्यांचं वक्तव्य

News Desk