HW News Marathi
Covid-19

कोरोनाशी लढण्यास राज्य सरकार अपयशी, भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढ आहे. राज्यात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने काल (१८ मे) ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळाने आज (१९ मे) राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जात राज्यपालांची यांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजप महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (१८ मे) पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

News Desk

….नाहीतर आता पूर्ण लॉकडाऊन अटळ ! । छगन भुजबळ

News Desk

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार २२८ पार, तर ३८०० जण बरे होऊन घरी

News Desk