HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

मुंबई | ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ पुस्तकातील संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रकाशक आणि लेखिकेने माफी मागितली आहे. सर्व शिक्षा अभियानात या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकातील मजकूर संभाजी महाराजांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला होता. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात असल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला होता. या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे आणि नागपूर येथील प्रकाशक लाखे यांनी प्रकाशित केले आहे.

‘संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा मजकूर या पुस्तकात आहे.

सर्व शिक्षा अभियानात देखील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा समावेश आहे. कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आली होती. असा चुकीचा आणि अपमानास्पद मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे दुर्दैवी आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अबू आझमी यांना ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी फटकारले

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न सुटला, केंद्रिय निवडणूक आयोगाने दिली निवडणूकीची परवानगी

News Desk

साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

News Desk
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा ११ वा अवतार !

News Desk

मुंबई | भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हे विष्णूचा ११ वा अवतार आहेत. असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर हॅंडलवरुन यासंदर्भात ट्विट केले आहे. अवधुत वाघ महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर ते भाजपची बाजू मांडत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यासंदर्भात एक मराठीत तर दुसरे इंग्रजी ट्विट केले आहे. याशिवाय ‘यदा यदा ही धर्मस्य’ असे लिहित त्यांनी नरेंद्र मोदींना देखील एका ट्विटमध्ये टॅग केले आहे.

Related posts

सायंकाळी सातनंतर बंदी असताना ती बस का धावली

News Desk

अकरावी CET साठी सरकारला हायकोर्टकडून विचारणा!

News Desk

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल

News Desk