HW News Marathi
महाराष्ट्र

शिवरायांच्या नावाचा वापर करून फक्त राजकारण केले जाते – संभाजी भिडे

भिडे गुरुजी हे भीमा कोरेगाव या घटनेनंतर सध्या खूप चर्तेत आहेत. तर, भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्त्यावरून अनेकवेळी वाद निर्माण झाले आहेत. असेच काहीसे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी तासगावच्या धारकरयांची गडकोट मोहिमेच्या बैठकीत केले. शिवरायांच्या नावाचा वापर हा केवळ राजकारणासाठी केला जातो. काही राजकारण्यांसाठी शिवराय हे फक्त राजकारणापुरते मर्यादित आहेत व त्यामुळे राज्यातील २८८ आमदार हे बिनकामाचे आहेत असे ते यावेळी म्हणाले. राज्यातील आमदारांना धारेवर धरत शिवरायांच्या नावाचे निव्वळ राजकारण होते अशी सणसणीत टीका शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केली.

शिवरायांचे स्मारक बांधण्याबाबत भिडे यांनी राज्यातील आमदारांवर टीका केली असून यामध्ये भाजपचे खासदार संजय पाटील यांचावर निशाणा साधण्यात आला आहे. पाटील हे स्वतः मराठा असून कधीच ते शिवरायांच्या स्मारकाबत बोलत नाहीत व त्यासाठी कुठलाही पुढाकार घेत नाही. पाटील यांना जर शिवरायांप्रती आदर असेल तर ते काही नाही उपोषणासाठी बसत स्मारकासाठी पुढाकार घेत. यावरून निव्वळ शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारण केले जाते व त्यासाठी राज्यातील २८८ आमदार हे जबाबदार आहेत.

शिवाजी महाराज यांनी केलेल्या कामगिरी बाबत जागरूक राहून काम केले पाहिजेल ना की त्यांच्या नावाचे राजकारण केले पाहिजेल. आपला देश हा आतंकवाद व दहशदवाद यांच्या भोवऱ्यात सापडला असून आपल्या देशाला यांपासून मुक्त करण्यासाठी शिवरायांची शिकवण आमलांत आणली जात नाही तर असे न होता त्यांची विचारधारा जाणून घेतली पाहिजेल. भिडे गुरुजी यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील आमदारांची चांगलीच गोची होणार आहे तर,

तर, खासदार संजय पाटील हे भिडेंच्या या वक्तव्यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील हे नक्कीच पाहता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचा पक्ष कोणता?

News Desk

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna

बेळगाव सीमाप्रश्नावर कर्नाटक-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी !

News Desk