HW News Marathi
Covid-19

राज्यात नव्या रूग्णांची संख्या घटली!

मुंबई | कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णबाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण९४.७३ टक्के एवढं झालं आहे.

राज्यात एका दिवसात ३०७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत ९६१ नवे रूग्ण आढळले आहेत. आणि ८९७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त गोपीचंद पडळकरांवर जेसीबीतून चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव

News Desk

परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा !

News Desk

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk